जमीन पावन भारतातली, ही आमुची आई...
Quarantine काळात जाम bore होत yarr... सहजच खिडकीत डोकं टेकावलं आणि मनात विचार येऊन गेला की खुप पुढे चाललाय का आपला देश? मग या तरुण पिढीने खुप काही करायची गरज नाही का?.. अरे अरे ! चुकलंच जरा, आपल्याला तर खुप काही करायचय... खुप असे विषय आहेत की आपली पिढी ते करू शकते. उदाहरणार्थ : काय आहे हे जाती, धर्म? तुम्हाला माहित आहे का? कोणी काढल्या या अशा संकल्पना? असो, पण आत्ता सध्या जे सुरु आहे ते योग्य की अयोग्य? हिंदू , मुस्लिम, शिख, इसाई, बौद्ध हे सगळे वेगवेगळे धर्म आहेत. अरे, पण आपण सगळे माणसंच आहोत ना मग कशाला हव्या जाती आणि धर्म.... माणुसकी हाच एक धर्म मानावा आणि सरळ चालत राहावं. नको त्या कुरघोडी कशाला? हे धर्म आणि जातीवाद आत्ताच्या पिढीने तरी थांबवले पाहिजेत.आपण सुशिक्षित होतो पण फक्त पुस्तकी बरका ! हे धर्म, जाती बदलणार नाहीत. हे आपल्याला माहिती आहे. या कायम राहतील पण यामध्ये ही आपण सुधारणा आणू शकतो. ते कसं... धर्म जरी वेगळा असला, खाण्याच्या पद्धती वेगळ्या असल्या किंवा पोशाख वेगळे असले म्हणुन माणूस माणसापासू...